गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि इंडीयन ओव्हरसीसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर २६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नाही, असेही म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅम पित्रोदा यांच्यावर सडकून टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्षांचा सर्वात विश्वासू सल्लागार आणि मार्गदर्शक यांनी भारतीय सैन्याची निंदा करुन पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसाचा उत्साह साजरा करण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सॅम पित्रोदांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. २३ मार्च हा पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस आहे. या दिवसाच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे.
The most trusted advisor and guide of the Congress President has kick-started the Pakistan National Day celebrations on behalf of the Congress, ironically by demeaning India’s armed forces.
Shame! https://t.co/puSjTK8Y4x
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 22, 2019
हेही वाचा – २६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नाही – सॅम पित्रोदा
नेमकं काय म्हणाले मोदी?
या संदर्भात पंतप्रधान नरेंदेर मोदी म्हणाले की, ‘दहशतवादाला प्रतिकार करण्याची इच्छाच काँग्रेसच्या नेत्यांची नव्हती. मात्र, हा नवा भारत आहे. आम्ही दहशतवादाला प्रतिकारही देणार आणि सडेतोड उत्तरही देणार.’
Loyal courtier of Congress’ royal dynasty admits what the nation already knew- Congress was unwilling to respond to forces of terror.
This is a New India- we will answer terrorists in a language they understand and with interest! https://t.co/Mul4LIbKb5
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 22, 2019
हा सैन्याचा अपमान – मोदी
यासोबतच मोदी म्हणाले की, विरोधक देशाच्या सैन्याचा अपमान करत आहे. मी माझ्या भारतीय जनतेला आवाहन करतो की, विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या वक्तव्यावर प्रश्वन विचारा. त्यांना सांगा की १३० करोड भारतीय विरोधकांचे वादग्रस्त वक्तव्य आणि कामे कधीच विसरणार नाही. जनता भारतीय सैन्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे.’
Opposition insults our forces time and again.
I appeal to my fellow Indians- question Opposition leaders on their statements.
Tell them- 130 crore Indians will not forgive or forget the Opposition for their antics.
India stands firmly with our forces. #JantaMaafNahiKaregi https://t.co/rwpFKMMeHY
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 22, 2019