घरदेश-विदेशसमझोता बॉम्बस्फोट प्रकरण : असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता

समझोता बॉम्बस्फोट प्रकरण : असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता

Subscribe

समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुला येथील विशेष एनआयए कोर्टाने बुधवारी स्वामी असीमानंद यांच्यासह लोकेश शर्मा, कमाल चौहान, राजिंदर चौधरी या चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुला येथील विशेष एनआयए कोर्टाने आज, बुधवारी स्वामी असीमानंद यांच्यासह लोकेश शर्मा, कमाल चौहान, राजिंदर चौधरी या चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. १८ फेब्रुवारी २००७ रोजी दिल्ली-लाहोर दरम्यान धावणाऱ्या समझोता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. पानीपतजवळच्या दिवाना रेल्वेस्थानकातून ही गाडी मार्गस्थ होताच स्फोट होऊन त्यात ७० जणांचा मृत्यू तर ५० प्रवासी जखमी झाले होते. यात बहुसंख्य प्रवासी पाकिस्तानी नागरीक होते.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण

पाकिस्तानी मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या हेतूने बॉम्बस्फोट घडवण्यात आला असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. समझोता एक्सप्रेस पानिपत जवळील दिवानी गावामध्ये असताना हा बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी अटारीच्या दिशेने ही ट्रेन जात होती. या ट्रेनचे अटारी हे भारतातील शेवटचे स्थानक आहे. अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथीय संघटनेचे सदस्य असीमानंद यांना या बॉम्बस्फोटात आरोपी बनवण्यात आले होते. लोकेश शर्मा, सुनील जोशी, संदीप डांगे आणि रामचंद्र कालासांग्रा याचे नाव सुद्धा आरोपत्रात होते. या स्फोटाचा मास्टरमाईंड सुनील जोशी २००७ साली मध्य प्रदेश देवास येथे मृतावस्थेत सापडला होता.

- Advertisement -

समझोता एक्सप्रेस

२२ जुलै १९७६ रोजी समझोता एक्सप्रेस सुरु झाली. सुरुवातीला अमृतसर ते लाहोर या ४२ किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावायची. समझोता एक्सप्रेस दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. ८० च्या दशकात पंजाबमधील वातावरण बिघडू लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेने अटारीमधून समझोता एक्सप्रेस बंद केली. जेव्हा ही ट्रेन सुरु झाली तेव्हा दररोज या ट्रेनच्या फेऱ्या होत असतं. १९९४ पासून या ट्रेनच्या साप्ताहिक फेऱ्या सुरु झाल्या. पाकिस्तानात लाहोर आणि भारतात दिल्लीमध्ये या ट्रेनचा थांबा आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केल्यानंतर २००२ ते २००४ अशी दोन वर्ष समझोता एक्सप्रेस बंद करण्यात आली होती.

हेही वाचा –

कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

२००२ च्या गोध्रा जळीतकांडाप्रकरणी आरोपी याकूबला जन्मठेप

बोलतो कमी आणि काम जास्त करतो; पार्थचं ट्रोलर्सना उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -