अभिनेता कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्यापैकी एक आहे. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता कार्तिक आर्यनने (kartik aaryan) बऱ्याच संघर्षानंतर फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली. सध्या तो अनेक मोठं मोठ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम करत आहे.पण नुकतच कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढण्याचे सत्र सुरू आहे. त्याला अनेक सिनेमामधून काढले जात असल्याच्या चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत. धर्मा प्रॉडक्शन हाऊसचा बिग बजेट सिनेमा ‘दोस्ताना 2’ मधून कार्तिकची एक्जिट झाल्या नंतर आता आणखीन एक प्रोजेक्ट कार्तिकच्या हातातून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमातूनसुद्धा कार्तिकला काढून टाकल्याचे बोलले जात आहे. पण या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे दिग्दर्शक आनंद राय यांनी स्पप्ष्ट केलं आहे. “आमच्या ऑफिस मध्ये अनेक अभिनेते भेटण्यास येतात. याचा हा अर्थ होत नाही की आम्ही त्यांच्या सोबत सिनेमा बनवणार आहोत किंवा साईन केला आहे. तसेच आम्ही आयुष्मान खुराना सोबत एका सिनेमा बद्दल बोलत आहोत” अशी माहिती दिग्दर्शक आनंद एल राय यांनी माहिती दिली आहे. तसेच असे बोलण्यात येत आहे की दिग्दर्शक आनंद एल राय यांनी आपल्या आगामी चित्रपटात कार्तिकच्या जागी आयुष्मानची वर्णी लावली आहे. आणि कार्तिक सोबत एका तामिळ सिनेमाचा रिमेक करण्याबद्दल विचार करण्यात येत आहे. अद्याप या बद्दल अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
View this post on Instagram
अभिनेता कार्तिक आर्यनच्या हातून अनेक बिग बजेट सिनेमा निसटत असल्याने बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हे हि वाचा – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम करन मेहरा अटक,पत्नीने केला घरघुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल!