बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना अज्ञात गुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. ही धमकी खंडणीसाठी देण्यासाठी आली. त्यावेळी त्यांना शिवीगाळही करण्यात आली. या सर्व प्रकरणी उदित नारायण यांनी अंबोली पोलीस स्टेशनमध्ये आणि मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी शाखेकडे तक्रार केली आहे.
उदित नारायण यांनी तक्रारीत असे नमुद केले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना अज्ञात व्यक्तींकडून तीन वेळी जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. हा फोन त्यांना नेमका शुटिंगच्या ठिकाणी असताना येतो. फोन करणारी व्यक्ती ही नेहमी त्यांना रवी पुजारी असल्याचे सांगते. फोनवर मोठी रक्कम देण्याची मागणी करते आणि जर ही मोठी रक्कम दिली नाही तर शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.
Mumbai Police have forwarded the case of playback singer Udit Narayan, who alleged that he has been receiving threat calls from an unknown person for past one month, to anti-extortion cell (AEC) of the Mumbai crime branch. (File pic) pic.twitter.com/M4JVHzbMzr
— ANI (@ANI) July 29, 2019
घडलेल्या संबंधित प्रकरणासंदर्भात पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन हे बिहार राज्यात असल्याचे कळाले आहे. ज्या फोनवरून त्यांना धमकी येत होती तो फोन नंबर हा संबंधित सिमकार्डच्या कंपनीत उदित नारायण याच्या वॉचमनचा नंबर म्हणून नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या संशयावरून वॉचमनची चौकशी केली तर त्या वॉचमनचा फोन तीन महिन्यांपूर्वी चोरी गेला असल्याचे कळाले. जेव्हा हा फोन चोरील गेला तेव्हा हा वॉचमन बिहारमध्ये होता.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच उदित नारायण यांच्या घराबाहेर पोलिसांना साध्या वेशात तैनात करण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले.