घरफिचर्सप्रतिभासंपन्न लेखक पु. भा. भावे

प्रतिभासंपन्न लेखक पु. भा. भावे

Subscribe

भावे हे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वा. सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. हिंदुमहासभा या राजकीय पक्षाचे ते काही काळ सक्रिय कार्यकर्तेही होते. हिंदुहितविरोधी आचारविचार हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. त्यामुळेच त्यांच्या निबंधवाङ्मयातून तथाकथित पुरोगामीपणावर वारंवार टीका आढळते.

पुरुषोत्तम भास्कर भावे हे मराठीतीस एक अष्टपैलू व प्रतिभासंपन्न लेखक. कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन इ. विविध साहित्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी धुळे येथे झाला. लेखन हा भावे यांचा जीवनव्यापी व्यवसाय होता. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ओम् फस्’ ही कथा लिहिली व आपल्या लेखनतपस्येचा श्रीगणेशा केला. भावे यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले व नागपूरला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास झाला. संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव त्यांना घ्यावे लागले. वाचनाचे त्यांना विलक्षण वेड होते. या वाचनामुळेच त्यांच्यातील वाङ्याभिरूचीचे पोषण झाले.

किर्लोस्कर खबरमध्ये (जुलै १९३१) त्यांची ‘फुकट’ ही कथा प्रकशित झाली. तथापि त्यांचे लेखणीचे व प्रतिभेचे सामर्थ्य प्रगट झाले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या नागपूरच्या सावधान या साप्तहिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होताच (१९३६) त्यांतून प्रगट होणार्‍या भाषासौंदर्याने व तेजस्वीपणाने वाचक मुग्ध होऊन गेले. अच्युत बळवंत कोल्हटकर व शिवराम महादेव परांजपे ह्या दोन प्रसिद्ध शैलीकार साहित्यिकांच्या लेखनगुणांचे मनोज्ञ रसायन भावे यांच्या शैलीतून प्रगट झाले. आदेश (१९४१-४८) या त्यांच्या स्वतःच्या साप्ताहिकातूनही त्यांचे अनेक चित्तवेधक लेख प्रसिद्ध झाले. मूलतः प्रचारी स्वरूपाचे असूनही त्यांचे अनेक लेख वाङ्यगुणांनी मंडित झालेले दिसतात. त्याचे कारण त्यांची विशिष्ट लेखनशैली हेच होय. रक्त आणि अश्रू (१९४२) हा त्यांचा लेखसंग्रह केवळ त्यांच्याच नव्हे, तर एकूण मराठी निबंधवाङ्मयाताही अद्वितीय असा आहे. परखड परंतु तर्कशुद्ध, चिंतनात्मक तरीही भावना उचंबळून सोडणारे असे त्यांचे वाङ्य वैशिष्ठ्यपूर्ण आहे. वाघनखे (१९६१), विठ्ठला पांडुरंगा (१९७३), अमरवेल (१९७४), रांगोळी (१९७६), इ. त्यांचे चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. स्मरणी (१९७४) हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रहही उल्लेखनीय आहे.

- Advertisement -

भावे हे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वा. सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. हिंदुमहासभा या राजकीय पक्षाचे ते काही काळ सक्रिय कार्यकर्तेही होते. हिंदुहितविरोधी आचारविचार हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. त्यामुळेच त्यांच्या निबंधवाङ्मयातून तथाकथित पुरोगामीपणावर वारंवार टीका आढळते. म. गांधी व काँग्रेस पक्ष यांच्या धोरणावरही भावे कडाडून हल्ला करतात. भावे हे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक व प्रवक्ते होते. अखंड भारत हे त्यांचे श्रद्धास्थान होते. त्यांच्या सार्‍या लेखनामधून त्यांच्या या जीवनदृष्टीचे दर्शन घडते. त्यांच्या वृत्तीतील निर्भय झुंजारपणा त्यांच्या साहित्यातूनही डोकावतो.
भावे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक असले, तरी कर्मठ नव्हते, प्रतिगामी नव्हते. जीवनातील दिव्यत्व, पौरुष, सौंदर्य यांचे ते पूजक होते. स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतानाच ते स्वैराचारावर टीका करीत. जीवनव्यवहारातील दांभिकतेचा व ढोंगीपणाचा त्यांनी विलक्षण तिटकारा होता. भारतीय संस्कृतीतील केवळ सत्वांशच ते ग्राह्य मानीत आणि हिंदुसमाजाच्या ऐक्याला विघातक अशा जातिभेदादी गोष्टींवर टीका करीत. अशा या प्रतिभासंपन्न लेखकाचे १३ ऑगस्ट १९८० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -