घरदेश-विदेशकरोनाबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर 132 गुन्हे

करोनाबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर 132 गुन्हे

Subscribe

गैरप्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलचे लक्ष

करोनाचा प्रादुर्भाव वाढु नये, यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात खोटे, आक्षेपार्ह संदेश फॉरवर्ड करणार्‍यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरची कारवाई प्रभावीपणे सुरू असून अशा प्रकरणी आजपर्यंत 132 गुन्हे दाखल करण्यात आले असून 35 जणांना अटक करण्यात आली आहे. टिकटॉक, फेसबुक , ट्विटर यांसारख्या चालणार्‍या गैरप्रकारांवर महाराष्ट्र सायबर बारीक लक्ष ठेवून आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा राज्यातील काही गुन्हेगार व समाजकंटक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे.

- Advertisement -

बुधवारपर्यंत राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 132 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये बीड 16, कोल्हापूर 13, पुणे ग्रामीण 11, मुंबई 9, जालना 8, सातारा 7, जळगाव 7, नाशिक ग्रामीण 6, नागपूर शहर 4, नाशिक शहर 5, ठाणे शहर 4, नांदेड 4, गोंदिया 3, भंडारा 3, रत्नागिरी 3, परभणी 2, अमरावती 2, नंदुरबार 2, लातूर 1, उस्मानाबाद 1, हिंगोली 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केल्यावर असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 79 गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत 35 आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

राज्यात काल कोल्हापूर, बीड, जालना, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद आदी विविध ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये आरोपीनी आपल्या फेसबुक /व्हाट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडियाचा (social media ) वापर करून करोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -