घरताज्या घडामोडीसाखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराबाबत कारवाई करा; चंद्रकांत पाटलांचे अमित शाहांना पत्र

साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराबाबत कारवाई करा; चंद्रकांत पाटलांचे अमित शाहांना पत्र

Subscribe

चंद्रकांत पाटील यांनी ३० साखर कारखान्यांची यादी पत्रासोबत शाह यांना पाठवली आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल भावाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईप्रमाणेच अन्य करखान्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पाटील यांनी पत्रात केली आहे. त्यासाठी त्यांनी ३० साखर कारखान्यांची यादी पत्रासोबत शाह यांना पाठवली आहे.

ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्यामुळे राज्यातील कायदा पाळणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अशाच रितीने आणखी साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहारावर तातडीने कारवाई करावी. अन्यथा संबंधित व्यक्ती पुरावे नष्ट करू शकतात किंवा त्यामध्ये त्रयस्थ हितसंबंध निर्माण करून कायदेशीर प्रक्रियेस विलंब लावू शकतात, असे चंद्रकांत पाटील या पत्रात म्हणाले.

- Advertisement -

राज्य सहकारी बँकेमार्फत साखर कारखाने संचालकांच्या नातेवाईकांना कवडीमोल किमतीत विकले गेले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना २२ ऑगस्ट २०१९ रोजी आर्थिक गुन्हे शाखेला पाच दिवसात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार अजित पवार आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल झाला होता. आर्थिक गुन्हे शाखेने राजकीय दबावामुळे अजित पवार, जयंत पाटील अशा नेत्यांचा सहभाग असलेल्या या प्रकरणाबाबत ७२ हजार पानांचा तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला आहे. तथापि, आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यापूर्वीच ईडीने दक्षतेने कारवाई केल्यामुळे दखल घेतली गेली आणि जरंडेश्वरच्या जप्तीसारखी कारवाई केली गेली, असेही चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -