घरताज्या घडामोडी'आमचं रिक्षाचं सरकार, बुलेट ट्रेनचे नाही'

‘आमचं रिक्षाचं सरकार, बुलेट ट्रेनचे नाही’

Subscribe

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या टीकांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले उत्तर दिले. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांची सरकार ही गरिबांची सरकार आहे. ते पुढे हे देखील म्हणाले की आमचं सरकार हे रिक्षाचे सरकार आहे त्यांना बुलेट ट्रेन ही परवडणार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ज्या मुद्दयावर टीका केली होती त्या प्रत्येक मुद्दयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले उत्तर दिले आहे.

गरिबांना रिक्षाच परवडते बुलेट ट्रेन परवडत नाही

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान सरकाराला तीन चाकी रिक्षाचे सरकार म्हंटले होते ज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले की निश्चितच त्यांचे सरकार हे सर्व गोर गरीबांचे सरकार आहे. या सामान्यांना गोर गरीबांना तीन चाकी रिक्षाच परवडते त्यांना बुलेट ट्रेन ही परवडणार नाही असे देखील ते म्हणाले. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकांवर उत्तर दिले.


हेही वाचा: ‘सामना’त पंतप्रधानांचे कौतुक नाही का दिसले?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -