घरताज्या घडामोडीराज्याला विजेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी तत्कालिक तसेच दीर्घकालीन धोरण निश्चित करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याला विजेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी तत्कालिक तसेच दीर्घकालीन धोरण निश्चित करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Subscribe

राज्यातील विजेसंदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाची बैठक घेतली होती. या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. राज्याला विजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी तत्कालीक तसेच दीर्घकालीन धोरण निश्चित करा असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मे.वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

राज्यात सुरु असलेल्या लोडशेडिंगच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली आहे. राज्याची सध्याची वीज निर्मिती, कोळशाचा साठा, वीजेची आजची आणि भविष्यातील मागणी आणि याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेतला. राज्यात मागील पाच दिवसापासून कोणत्याही स्वरूपाचे भारनियमन करण्यात आले नाही ही चांगली बाब असून अशीच परिस्थिती भविष्यातही कायम राहण्यासाठी वीज निर्मिती, कोळसा साठा, आयात कोळसा, वीज खरेदी याचे उत्तम नियोजन करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वीजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील त्याच्या अंमलबजावणीचा आपण दर आठवड्याला आढावा घेणार असून घेण्यात आलेल्या निर्णयांचा कार्यपूर्ती अहवाल या बैठकीत सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

पावसाळ्याचे नियोजन करावे

केंद्र शासनाने १० टक्के कोळसा आयातीला मान्यता दिली आहे ही प्रक्रिया गतीने पूर्णत्वाला न्यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, येणारा पावसाळा लक्षात घेऊन कोळशाच्या साठ्याचे नियोजन करण्यात यावे. राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे उपलब्ध होईल यादृष्टीने महानिर्मितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. उरण येथील गॅस प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

५ दिवसांपासून भारनियमन नाही – राऊत

राज्यात भारनियमन न करण्यासाठी काही उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. उपाययोजनांना यश मिळत असल्यामुळे राज्यात ५ दिवसांपासून भारनियमन करण्यात आले नाही अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. महाराष्ट्रासह देशातच वीजेची टंचाई निर्माण झाली आहे. कोळशाचा साठा अपुरा असल्यामुळे भारनियमन सुरु आहे असे नितीन राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यात भारनियमन करावे लागू नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे व मागील ५ दिवसांपासून राज्यात कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात आलेले नसल्याची माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. एकट्या महाराष्ट्रातच नाही तर देशात वीजेची टंचाई आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा हे त्यामागचे मुख्य कारण असून इतर १२ राज्यातही कोळशामुळे भारनियमन सुरु असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा : Bullock Cart Race : बैलगाडा मालक, आयोजकांवरील गुन्हे मागे घेणार, गृहमंत्रालयाने काढली अधिसूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -