घरमहाराष्ट्रसंप मागे घेण्याच्या घोषणेनंतरही कर्मचारी आक्रमक, संप सुरूच राहणार!

संप मागे घेण्याच्या घोषणेनंतरही कर्मचारी आक्रमक, संप सुरूच राहणार!

Subscribe

मुंबई : गेल्या सात दिवसांपासून संपावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी संप मागे घेत असल्याची घोषणा समन्वयक विश्वास काटकर यांनी केली. उद्यापासून कामावर रुजू व्हा, असे आवाहनही त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संप मागे घेतला असल्याची सभागृहात घोषणा केली होती. परंतु मध्यवर्ती समितीने संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही अमरावती जिल्ह्यातील कर्मचारी आक्रमक आहेत. हा विश्वासघात असून संप सुरुच राहणार, अशी भूमिका काही कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे उद्या किती कर्मचारी कामावर रुजू होणार आणि किती कर्मचारी संप सुरूच ठेवणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

जुन्या पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने हा संप सुरुच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. कारण अमरावती जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फुटीची ठिणगी पडली आहे. अमरावतीच्या महिला संपकऱ्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, संप मागे घेण्याबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही गेल्या सात दिवसांपासून हमाली केलेली नाही. त्यामुळे तुम्ही परस्पर कसे निर्णय घेता? असा सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे. तसेच जोपर्यंत सरकारचा जीआर आम्हांला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संप सुरुच ठेवणार असल्याची भूमिकाही या महिलांनी घेतली आहे. या महिलांनी सांगितले की, आम्हाला कोणत्याही समितीची गरज नसून हा लढा आम्ही असाच सुरु ठेवू. शासन लेखी स्वरुपात आम्हांला काही देत नाही तोपर्यंत अमरावतीमध्ये संप सुरुच राहिल.

- Advertisement -

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य असून त्यासंदर्भात एक समिती गठित करण्यात आली आहे आणि तीन महिन्यांमध्ये अहवाल येईल, असे समन्वयक विश्वास काटकर यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे निवृत्तीवेतन देण्यास सरकार तयार आहे. तसेच समितीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मध्यवर्ती समितीने घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -