मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज मुबंईतील शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची पहिली सभा होत आहे. या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो अशा शब्दात भाषणाला सुरुवात केली नाही. त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिषा शेलार यांनी ट्वीट करत भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? असा थेट सवाल विचारला. यावर आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. (I want to ask the Modi devotees are you not a patriot Uddhav Thackerays question after criticism)
हेही वाचा – Jitendra Awhad : अजितदादांच्या कानाला कोण दोघं लागायचे हे…; भाजपाचा उल्लेख करत आव्हाडांचे सूचक वक्तव्य
आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे..
◆श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला ?
◆भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का?
◆भाषणाची सुरुवात
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!”…— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) March 18, 2024
आशिष शेलार यांनी ट्वीट करताना म्हटले की, आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा”सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? सभा एक झाली, पण प्रश्न अनेक निर्माण करून गेली. काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची “मशाल” आता खंजीर, वाघ, मर्द आणि कोथळा अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला होता. यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी काल माझ्या भाषणाची सुरुवात ‘माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो‘, अशी केल्यावर मोदीभक्तांनी माझ्यावर टीका केली. मला मोदीभक्तांना विचारायचंय, तुम्ही ’देशभक्त‘ नाही का? pic.twitter.com/dC2v5T8qfJ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 18, 2024
हेही वाचा – Eknath Shinde : राज ठाकरेंचा महायुतीत सहभाग? मुख्यमंत्री म्हणतात, योग्यवेळी योग्य निर्णय…
हिंगोलीत जनसंवाद कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काल माझ्या भाषणाची सुरुवात “माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो‘, अशी केल्यावर मोदीभक्तांनी माझ्यावर टीका केली. त्यामुळे मला मोदीभक्तांना विचारायचं आहे की, तुम्ही ’देशभक्त‘ नाही का?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील नेत्यांना विचारला आहे.