घरCORONA UPDATEतर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल, राऊत यांची 'सामना' मधून रोखठोक भूमिका!

तर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल, राऊत यांची ‘सामना’ मधून रोखठोक भूमिका!

Subscribe

कोरोनाच्या या संकटात मंत्रीकपात करण्याची वेळ येईल असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी  सामनाच्या रोखठोक या सदरात  केलं आहे. आजच्या सामना वृत्तपत्रात रोखठोक: बाबा मन की आखें खोल या लेखात त्यांनी अनेक विषयांवर मतं मांडली. यावेळी संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल.”

देशातील परिस्थिती दुर्देवी आहे आणि सर्वच पक्षांनी ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवे. कोरोना रोगापेक्षा बेरोजगारी, भूक, यामुळे त्रस्त असलेल्या लोकांनी ठिकठिकाणी उद्रेक केला आहे. गोळीबार न करता अनेक रांज्याच्या सीमेवर मुडदे पडत आहेत. कोरोनाच्या संकटात एखाद्याला घरी जाण्यापासून रोखणे अमानुषतेचे दर्शन आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे  महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही असे मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगितले. मंत्रालयातही अनेकांच्या हाताला काम नाही तिथे इतरांचे काय घेऊन बसलात?  कोरोनामुळे आय.ए.एस. आयपीएस अधिकाऱ्यांचा एक मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्क आहे. महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल”

लेखात संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे

कोरोना काळात राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. लोकांना विरोधकांना घरी बसवले व संकटकाळात ते सरकारविरोधी काम करत आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री टाळेबंदीच्याबाबतीत कठोर आहेत. करोनाचे संक्रमण वाढू नये ही त्यांची भूमिका आहे तर शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते निर्बंध शिथी व्हावेत लोकांनी हळूहळू स्वतःची सुरक्षा सांभाळून कामधंद्यास लागावे या मताचे आहेत. राजकारण बंद करा असं म्हणत त्यांनी विरोधकांना निशाणा साधला आहे. राजकारण बंद करा आणि लोकांच्या प्रश्नाकडे पहा. ही राजकारणाची वेळ नाही. सगळ्यात अपयशी राज्य महाराष्ट्र नाही तर गुजरात आणि उत्तर प्रदेश आहे.


हे ही वाचा – लवकरच लोकल सुरू होणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -