घरताज्या घडामोडीअनंत चतुर्दशीपासून पुढील 3 दिवस मुंबईला यलो अलर्ट जारी

अनंत चतुर्दशीपासून पुढील 3 दिवस मुंबईला यलो अलर्ट जारी

Subscribe

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या तुफान बॅटींगमुळे रस्ते वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. अशातच मुंबईला ९ सप्टेंबरपासून पुढील ३ दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या तुफान बॅटींगमुळे रस्ते वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. अशातच मुंबईला ९ सप्टेंबरपासून पुढील ३ दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीपासून म्हणजेच ९ सप्टेंबरपासून ते ११ सप्टेंबरपर्यंत मुंबईत यलो अलर्ट असणार आहे. (IMD yellow alert issued to Mumbai from 9 September to 11 September)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील शहर भागातील मलबार हिल, सीएसएमटी भागात १७ मिमी, पूर्व उपनगरातील मुंलुड येथे २८ मिमी, भांडुप – २७ मिमी, विक्रोळी -२६ मिमी, गवाणपाडा येथे २२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच, पश्चिम उपनगरातील अंधेरी (पूर्व) – ११ मिमी, मरोळ – ९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत गेल्या चार – पाच दिवसांपासून उष्णता जाणवत होती. ऑक्टोबर हिटचा अनुभव सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईकरांना जाणवत होता. उकाड्याने हैराण मुंबईकरांना बुधवारच्या मुसळधार पावसाने मात्र काहीसे, ‘ठंडा ठंडा, कुल कुल’ केले. त्यामुळे उकाड्याने हैराण मुंबईकरांना काहीसे हायसे वाटले. तर छत्रीशिवाय घराबाहेर पडल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी कुठेतरी आडोसा घ्यावा लागणाऱ्या नागरिकांनी पावसाळा शिवीगाळ करीत त्याच्या नावाने बोटे मोडली नसेल तरच नवल.

- Advertisement -

मुंबईत दरवर्षी चार महिने तरी पावसाळा असतो. फार फार तर सप्टेंबर अखेरीस अथवा काही दिवस अगोदर पावसाळा निघून जातो. मात्र यंदा पावसाने जून महिन्यात खूप कमी बरसात केली होती. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याने तळ गाठल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांवर १० टक्के पाणी कपातीचे संकट लादले होते. सुदैवाने जुलै व ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने पाणीपुरवठा करणारे सात तलाव जवळजवळ ९८ टक्के भरले आहेत.

मात्र मुंबईच्या दृष्टिकोनातून पाऊस सप्टेंबर अखेरपर्यन्त बरसणे व तलावांत वर्षभर पुरेल इतका म्हणजे १४,४७,३६४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे महत्त्वाचे असते. तर पुढील वर्षभर मुंबईकरांना पाणीकपातीशिवाय पाणीपुरवठा होऊ शकतो. तलावातील पाणीसाठ्याबाबतचा आढावा पावसाळा संपताच १ ऑक्टोबर रोजी पालिकेकडून घेण्यात येतो. त्यामुळे मुंबईकरांसाठी पावसाळा सप्टेंबर अखेरपर्यँत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हवामान खात्याने बुधवारपासून पुढील आठवडाभर मुंबई, कोंकण, सोलापूर, गोंदिया आदी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुढील २४ तासांत हवामान खात्याचा पुन्हा एकदा अचूक अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपली यंत्रणा सज्ज ठेवणे व मुंबईकरांना, गणेशोत्सव मंडळांना ‘अलर्ट’ राहण्याबाबत पूर्वसूचना देणे गरजेचे ठरणार आहे.


हेही वाचा – महत्त्वाची बातमी! लालबागच्या राजाच्या नवसाची आणि मुखदर्शनाची रांग ‘यावेळी’ होणार बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -