घरताज्या घडामोडीजितेंद्र आव्हाड प्रस्थापितांना खूश करणारे कंत्राटी कामगार, गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड प्रस्थापितांना खूश करणारे कंत्राटी कामगार, गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Subscribe

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरू राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला असं वक्तव्य पडळकरांनी केलं आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad)  यांच्यावर हल्लाबोल केला. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी केलीय.’ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसींविषयी जी काही प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायत ते निव्वळ हास्यास्पद आणि फसवं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत यांनी दीड वर्ष नुसत्या तारखा घेतल्या. केंद्राच्या नावाने ओरड केली. आता मात्र यांची पायाखालची जमीन सरकलेली आहे. आताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहिती नाही. राज्य मागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलेय.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर पडळकरांची टीका

तसेच जितेंद्र आव्हाड म्हणतात, माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत.

- Advertisement -

अजित पवार यांच्यावरही केली टीका

दुसरीकडे अजित पवार म्हणतात, इंपेरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका आम्ही घेणार नाहीत, वेळ पडली तर प्रशासक नेमू म्हणजेच आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच हेतू दिसतोय. ओबीसींवर तुम्हाला एवढंच प्रेम असेल तर भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार देणार आहे, त्यांना आपण निवडून द्यावे. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसीच उमेदवार देणार आहात, असे तरी जाहीर करावे.


हेही वाचा – OBC समाजाचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेणार का?, भाजपचा राष्ट्रवादीला सवाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -