घरमहाराष्ट्रवाजपेयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवला

वाजपेयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवला

Subscribe

राज्य सरकारला तीनचाकी रिक्षा म्हणणाऱ्या भाजपला खडसेंचे प्रत्युत्तर

महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार रिक्षा म्हणून भाजपचे नेते टीका करतात. मग, अटलजींनी तर एनडीएचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचे सरकार सांभाळले होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजप मी सोडली नाही तर मला भाजपने बाहेर ढकलले. मागच्या काळात माझा अपमान झाला, डावलले गेले, मला पक्ष सोडायला भाग पाडले, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. भाजप त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी सरकार पडणार असल्याचे दावे करण्याचे उद्योग करत आहे. मी तिकडे असताना हे उद्योग केले आहेत, आमदार सांभाळण्यासाठी ते करावेच लागते. लाल दिव्याच्या गाड्या 50 आणि आश्वासने 200 अशी ही परिस्थिती आहे, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

- Advertisement -

जळगावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे आभार मानले आहेत. अनेकांनी मला विचारणा का केली, की तुम्ही राष्ट्रवादी का निवडली? बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम शरद पवार यांनी केले म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही. पवार इज पॉवर. पवारांनी मुख्यमंत्री असताना मैलाचे दगड व्हावे, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी 90 मध्ये त्यांच्यासोबत काम केले. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील, असे खडसे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -