घरमहाराष्ट्र'महाशिवआघाडी' नैतिकतेला धरुन नाही; सुप्रीम कोर्टात याचिका

‘महाशिवआघाडी’ नैतिकतेला धरुन नाही; सुप्रीम कोर्टात याचिका

Subscribe

'महाशिवआघाडी' नैतिकतेला धरुन नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असताना, आता शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना ‘महाशिवआघाडी’सोबत जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत. राज्याच्या राजकारणात होऊ घातलेल्या या महाशिवआघाडी विरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. यावर सुप्रीम कोर्टाने शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही आघाडी नैतिकतेला धरुन नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आली आहे.

महाशिवआघाडी विरोधात याचिका

महायुती तुटल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला सोबत घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एक नवी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, या महाशिवआघाडी विरोधात हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांनी याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले हिंदू महासभेचे प्रमोद जोशी

भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्रात निवडणूकपूर्वी युती केली होती. मात्र, विधानसबेच्या निकालानंतर ही युती तुटली आहे. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्यांवर या दोन्ही पक्षांनी मतदारांकडे मते मागितली आहेत. तसेच मतदारांनी देखील युतीला मते दिली आहेत. दरम्यान, या युतीला पूर्ण बहुमत मिळाल्याने त्यांनीच सत्ता स्थापन करणे आवश्यक असताना शिवसेनेने केवळ सत्ता मिळण्यासाठी दुसऱ्या पक्षांसोबत जाण्याचा विचार सुरु केला आहे. हा प्रकार म्हणजे मतदारांशी द्रोह असल्याचा दावा प्रमोद जोशी यांनी केला आहे. शिवसेनेची ही भूमिका नैतिकतेला धरुन नसल्याने सुप्रीम कोर्टात या पक्षांच्या आघाडीच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याचे जोशी यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री शिवसेनेचाच; स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शरद पवार-सोनिया गांधी भेट ठरली


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -