घरमहाराष्ट्रराज्यातील आठ जिल्ह्यांत कडक निर्बंध लागणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

राज्यातील आठ जिल्ह्यांत कडक निर्बंध लागणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Subscribe

राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. एका मराठी वृत्तवाहिनीश संवाद साधताना त्यांनी हे संकेत दिले. देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्हे आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगरचा समावेश आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता लाईव्ह येणार असून कोणत्या घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची आढावा बैठक सुरु आहे.

राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावण्यात येतील असे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. बेड्स, ऑक्सिजन, कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही त्या ठिकाणी अधिक निर्बंध करुन गर्दी कशी टाळली जाईल याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

नागरिक स्वयंशिस्त पाळत नाहीत

लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द न वापरता निर्बंध लावले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती केली आहे. नाईट कर्फ्यू लावले आहेत. निर्बंध लावल्यानंतर गर्दी वाढतेय. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. लोकांनी काही दिवस नियमांचं पालन केलं तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. ज्यावेळी संसाधनं संपतात त्यावेळी चैन ब्रेक करण्यासाठी तातडीचा इलाज म्हणून लॉकडाऊन लावावा लागतो.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -