कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तसंच, मोठ्या प्रमाणात मृत्यूही झाले होते. तथापि, लोकसभेत याच्याशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी १९ राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले की नाही याची माहिती दिली. उर्वरित राज्यांनी माहिती दिलेली नाही. यात महाराष्ट्र सरकारने देखील ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले की नाही याची माहिती दिलेली नाही.
काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना मनसुख मांडवीय यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. मात्र, केवळ १९ राज्यांनी माहिती दिली असल्याचं लोकसभेत सांगितलं. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमण दीव, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, आसाम, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, सिक्कीम त्रिपुरा, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी माहिती दिली.
पंजाबनं ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती दिली
केवळ पंजाब सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती दिली असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. एकट्या पंजाबमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ४ मृत्यूची नोंद झाली आहे.
We had written to all States asking for data on it. 19 States responded, only Punjab reported four ‘suspected’ deaths due to oxygen shortage: Union Health Minister Dr Mandaviya in Lok Sabha on the question of ‘deaths due to oxygen shortage’ pic.twitter.com/xrZfXVpHf1
— ANI (@ANI) December 3, 2021