घरताज्या घडामोडीमोदीजी तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, पंजाबच्या घटनेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

मोदीजी तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, पंजाबच्या घटनेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भाजपकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले. पंजाबमधला शेतकरी आणि देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. त्यामुळे मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी पंजाबमध्ये घडलेल्या घटनेवर दिली.

भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष

पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा असते. त्यांच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नियोजित कार्यक्रमामुसार ते हेलिकॉप्टरने सभेला जाणार होते. परंतु अचानक त्यात बदल करून ते रस्ते मार्गाने निघाले. पंजाबमध्ये आधीपासूनच शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे याची त्यांना जाणीव असेलच. मोदींच्या सभेला गर्दी जमली नाहीम्हणून त्यांना सभा सद्द करावी लागली. पण खोटी माहिती पसरवून सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपकडून खटाटोप केला जात आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

- Advertisement -

सरकारवर दोष देण्याचा भाजपचा प्रयत्न

सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा कांगावा करत पंजाबमधील काँग्रेस सरकारवर दोष देण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सुरक्षेचाच मुद्दा विचारात घेतला तर गांधी कुटुंबाच्या जिवीताला नेहमीच धोका राहिला आहे. तरीही सोनियागांधी, राहुल गांधी जनतेत मिसळतात. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. उत्तर प्रदेशातील पीडित कुटुंबाला भेटण्यास जाताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेची काय परिस्थिती होती? असा सवाल पटोले यांनी केला.

प्रियंका गांधी यांच्याशी पुरुष पोलिसांनी धक्कुक्की केली होती हे भाजप विसरले काय? त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कोणी केली होती? कोणाच्या इशाऱ्यावर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवण्यात आले होते? याचे उत्तरही भाजपने द्यावे, असे आव्हानही नाना पटोले यांनी भाजपला दिले.

- Advertisement -

हेही वाचा : UP Elections 2022: ओमिक्रॉनचा विस्फोट ! योगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधींना यूपी निवडणुकीत प्रचारात सुचले शहाणपण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -