घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रझाडांना राख्या बांधून अनोख रक्षाबंधन

झाडांना राख्या बांधून अनोख रक्षाबंधन

Subscribe

संगमनेर : तालुक्याच्या पठारभागातील बोटा येथील श्री गणेश बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे श्री नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थिनींनी गुरुवारी (दि.११) वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. वृक्ष आमचे भाऊ असून, ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे, अशी प्रार्थना केली. यावेळी विद्यार्थिनींनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.

संपूर्ण जगाला जागतिक तापमानवाढीचे संकट सतावत आहे. त्याचबरोबर दुष्काळाचा सामनाही करावा लागत आहे. पर्यावरण संवर्धन करणे काळाजी गरज बनली आहे. यासाठी शासन व सेवाभावी स्तरावरुनही प्रयत्न केले जात आहे. शाळा व महाविद्यालये झटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी रक्षाबंधनाचे औचित्य साधून बोटा येथील श्री नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी असंख्य वृक्षांना राख्या बांधून निसर्गाप्रती असलेले भावबंधाचे नाते वृद्धिंगत केले.

- Advertisement -

कोरोनासंकटात प्राणवायूची भासलेली कमतरता आणि दुष्काळ यामुळे निसर्गाचे आयुष्यातील महत्त्व अधोरेखीत झालेले आहे. त्यांच्याप्रती असलेले प्रेम व जबाबदारी यातून विद्यालयाच्या हरितसेनेच्या विद्यार्थिनींनी वृक्षांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र जठार, हरितसेना प्रमुख शंकर पानसरे, सुभाष हांडे, अशोक बगाड, आनंदा मधे, अशोक साळवे, सचिन फटांगरे, दीपाली शेळके, रोहिदास घुले, गणेश वाघमारे आदिंनी
परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -