‘राष्ट्रवादी काँग्रेस ही काय पार्टी आहे काय? राष्ट्रवादी काँग्रेस ही पार्टी नसून ती पवारने चालवलेली कंपनी’ आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच नाव न घेता केली आहे. शिवसंग्राम महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उदघाटन प्रसंगी ते पिंपरीत बोलत होते. यावेळी भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
आम्हाला इतिहास माफ करणार नाही
राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस संपत चालली आहे. जो आजोबांच्या आणि वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवत आहे, त्याला समाज मान्य करणार नाही. त्यामुळे जे राजकारणाला व्यवसाय समजतात त्यांना हद्दपार करण्याची संधी आहे. परंतु, ही संधी गमावली तर तुम्हा आम्हाला इतिहास माफ करणार नाही, असं बापट यावेळी म्हणाले आहेत.
राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी लादली आहे. हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही. तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही ते त्यागावर आणि समाजकार्यवर उभं असत. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही. तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे. असं म्हणत पार्थ अजित पवार वर पालकमंत्री गिरीश बापट यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा – काँग्रेसने कधीही हिंदू धर्मावर अन्याय केला नाही – शरद पवार
हेही वाचा – शरद पवारांनंतर कम्प्युटर बाबाने केली मोदींबाबत ‘ही’ भविष्यवाणी