घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? अर्थ; कळेना, एकनाथ खडसेंची टीका

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? अर्थ; कळेना, एकनाथ खडसेंची टीका

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुक्रवारी ठाण्यातील टेंभी नाका याठिकाणी दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आम्ही दीड महिन्यापूर्वी 50 थरांची हंडी फोडली होती, असे विधान केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर अनेक राकीय नेत्यांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. शिंदे काय बोलतील याचा नेम काही नाही, असा टोला खडसेंनी लगावला.

५० थरांची हंडी फोडल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, एकनाथ शिंदे कधी काय बोलतील? याचा काही नेम नाही. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ मला कळत नाही. ५० आमदारांना घेऊन दहीहंडी फोडली, म्हणजे नेमके काय केले? शिवसेनेतून ५० आमदार फोडले आणि त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले की भाजपासोबत गेले म्हणून सरकार स्थापन झाले. हे सर्व अर्थ न कळण्यासारखे आहे. त्यामुळे नेमके त्यांनी काय म्हटले आहे, याचा अर्थ मला तरी निश्चितपणे समजलेला नाही.

- Advertisement -

गोविंदांना दिलेल्या 5 टक्के आरक्षणावर टीका –

दहीहंडी पथकातील गोविंदाना ५ टक्के आरक्षण देण्यालाही एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला. भावनेच्या भरात अशा प्रकारचा निर्णय घेणं योग्य नाही. गोविंदा पथकाला ५ टक्के आरक्षण कोणत्या आधारावर देणार आहात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याचे निकष वेगळे –

शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचे निकष राज्य सरकारने ठरवून दिले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, परीक्षा आणि क्रीडा विभागाच्या काही नियमांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे क्रीडा नियमांमध्ये हा निर्णय बसत नाही, असे चित्र दिसत आहे. विशेष खेळ म्हणून दहीहंडीला मान्यता देत असताना अन्य लोकांवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.

वेगळ्या मार्गाने आरक्षण द्यावे लागेल –

सरकारने यापूर्वी प्रकल्पग्रस्तांना ३ टक्के आणि भूकंपग्रस्तांना २ टक्के आरक्षण देऊ केले आहे. अशा स्थितीत क्रीडा विभागातून दहीहंडी सारख्या मर्यादीत खेळाला ५ टक्के आरक्षण देणे, हा अन्याय ठरणारा निर्णय आहे. त्यामुळे गोविंदांना आरक्षण द्यायचंच असेल तर वेगळ्या मार्गाने दिले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने नवीन नियम आणि निकष ठरवले पाहिजेत, असे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -