घरमहाराष्ट्रनिलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले 'हे' चॅलेंज

निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले ‘हे’ चॅलेंज

Subscribe

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहण्याचे आव्हान दिले आहे.

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहण्याचे खुले चॅलेंज दिले आहे. गुरुवारी रत्नागिरी येथे निलेश राणे यांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी ठाकरे कुटुंबावर कडाडून टीका केली. निलेश राणे म्हणाले की, ‘उद्धव ज्यादिवशी ग्रामपंचायत निवडणूक लढवेल त्यादिवशी निलेश समोर ग्रामपंचायत निवडणूक लढवेल. बापाचं खातोय अजून…एक निवडणूक नाही लढवली आणि म्हणे पक्षप्रमुख. अरे निलेश राणे बाळासाहेब ठाकरेंवर बोलला. काय केलं तू? मालाडचे दोन-तीन टप्पोरी शिवसैनिक बोलले होते की, निलेश राणेला आम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही. अरे निलेश राणे महामार्गातून रत्नागिरीत आला आणि त्याच महामार्गाने आता मुंबईला जाईल. जा कुठल्या अवल्यादीचा आहे ते दाखव चल…बघून घेऊया’, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

‘ठाकरे कसे आहेत कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत’

निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गेल्या काही त्यांनी बाळासाहेबांवर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूचा आणि गायक सोनू निगम याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी त्यांनी भरसभेत बाळासाहेबांवर टीका केली आहे. निलेश म्हणाले की, ‘आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही का? तुझा देव तुझ्या देवाऱ्यात ठेव, मी माझा देव माझ्या देवाऱ्यात ठेवेन. आमच्या नादाला लागायचं नाही. ठाकरेंची आब्रू रस्त्यावर काढू. मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय काय व्हायचं, आम्हाला माहित आहे. ठाकरे कसे आहेत कळल्यावर लोकच अंगावर कपडे ठेवणार नाहीत’.

- Advertisement -

उदय सामंत यांची खिल्ली उडवली

निलेश राणे यांनी रत्नागिरी येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये भाषणाला सुरुवात करताच निलेश राणे यांनी शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांच्यावर टीका केली. निलेश राणे यांनी उदय सामंत यांची खिल्ली उडवली. ‘आता केस चिटकवलेले उदय सामंत सगळीकडे दिसताहेत. पण, फक्त डोक्यावरच केस दिसत आहेत. बाकी कुठे केस दिसत नाहीत’, अशा शब्दांमध्ये निलेश राणे यांनी उदय सामंत यांची खिल्ली उडवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -