घरताज्या घडामोडीCorona: औरंगाबादमध्ये मृत रुग्णांची संख्या ६१५ वर

Corona: औरंगाबादमध्ये मृत रुग्णांची संख्या ६१५ वर

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६१५ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यतील ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची स्थिती गंभीर असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. लवकर निदान झाल्यास उपचार करणे शक्य होत असल्याने ग्रामीण भागात आजारपण अंगावर काढू नका, असा सल्ला दिला जात आहे.

औरंगाबादमध्ये आज नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील शहागंज, आंबेडकरनगर, मुकुंदवाडी, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर गंगापूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच पैठणमध्येही संसर्ग वाढला असल्याचे निरीक्षण सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आहे.

- Advertisement -

दरम्यान, गुरुवारी शांतता समितीची बैठकही घेण्यात आली. यामध्ये करोना संसर्ग वाढणार नाही यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बुधवारपासून प्रतिजन चाचणी संच प्राप्त झाल्यानंतर चाचण्यांना पुन्हा वेग देण्यात आला. मात्र, लक्षणे असणाऱ्या आणि संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या घेण्याचे नियम पाळले जात आहेत.


हेही वाचा – Corona : नाशिकमध्ये ८२ टक्के रूग्ण कोरोनामुक्त


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -