घरमनोरंजनठरलं तर मग... परिणिती-राघवच्या नात्यावर आप पक्षाकडून शिक्कामोर्तब, असं केलं अभिनंदन

ठरलं तर मग… परिणिती-राघवच्या नात्यावर आप पक्षाकडून शिक्कामोर्तब, असं केलं अभिनंदन

Subscribe

संजीव अरोराच्या या ट्वीटने पुन्हा एकदा दोघांच्या रिलेशनशीपवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha Relationship: आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. नुकतेच हे दोघे लंच डेटवर गेले असताना स्पॉट झाले होते. तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची चर्चा आणखी जोर धरू लागली आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखी पसरू लागली आहे. मात्र, अद्याप या जोडप्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. यावर आता आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी शिक्कामोर्तब लगावला आहे. नुकतंच त्यांचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर परिणीतीचे फॅन्स लग्नासंदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत.

राघव आणि परिणीतीचं लग्न झालंय का? रिपोर्ट्सनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना दोघांच्या नात्याबद्दल माहिती आहे आणि ते या नात्याला सहमती दिली आहे. दोघेही लवकरच लग्नाची अधिकृत घोषणा करू शकतात, असा दावा केला जात आहे. दरम्यान, राघव चढ्ढाचा पार्टनर संजीव अरोरा याने एक ट्विट केलंय. हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालंय. या ट्वीटवरून चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल उत्सुकता दाखवत राघव आणि परिणीतीचं लग्न झालंय का? असा सवाल उपस्थित करत आहेत.

- Advertisement -

संजीव अरोरा यांनी या जोडप्याचे केले अभिनंदन
संजीव अरोरा यांनी आपल्या ट्वीटद्वारे राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे अभिनंदन केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचं अभिनंदन करतो. देव त्यांच्या पाठीशी राहो आणि प्रेम सदैव असेच राहो’. संजीव अरोरा यांनी आपल्या ट्वीटमध्ये राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांनाही टॅग केलं आहे.

- Advertisement -

संजीव अरोराच्या या ट्वीटने पुन्हा एकदा दोघांच्या रिलेशनशीपवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे, काही चाहते गोंधळात पडले आहेत की, राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी गुपचूप लग्न केलं आहे का? सोशल मीडियावर या ट्वीटनंतर चाहत्यांकडून प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. दोघांमध्ये काय खिचडी शिजत आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केलीय.

संजीव अरोरा यांच्या ट्विटवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, काय चाललं आहे? दोघांनी लग्न केलं का? असं देखील आणखी एका यूजरने लिहिले. लग्न झाले की आणखी काही?, ‘अफेअरची अफवा खरी आहे का?’ असे एक ना अनेक प्रश्न आता फॅन्स विचारू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -