घरमहाराष्ट्रराज्यातील रस्ते, पूल आणि इमारतींचा दर्जा सुधरवण्याासाठी सरकारचा 'हा' नवा प्लॅन

राज्यातील रस्ते, पूल आणि इमारतींचा दर्जा सुधरवण्याासाठी सरकारचा ‘हा’ नवा प्लॅन

Subscribe

सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाज गतिमान करण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली असून मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे गतिमान व कायापालट करण्याच्या दृष्टीने व विभागाची कार्यपध्दती अधिक दर्जेदार व सक्षम करण्यासाठी अभियंता दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर, २०२२ रोजी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विभागातील अभियंत्यांच्या नवनीवन संकल्पना व योजना यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यशाळेस राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता उपस्थित राहणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असे सुमारे ९८ हजार ००० कि.मी. च्या रस्त्यांची नवीन कामे तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येतात. सध्याच्या परिस्थितीत यामधील काही रस्त्यांची पुनर्बांधणी करणे आवश्यक असून त्या दृष्टीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. राज्यातील ब्रिटीश कालीन पूल, इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील येत असून हे पूल व इमारती आणि रस्ते यांचा दर्जा अधिक सुधारण्याचे आव्हान राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे. त्यादृष्टीने सदर कार्यशाळेमध्ये सविस्तर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.

- Advertisement -

१५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता षण्मुखानंद सभागृह, सायन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्र दुरुस्तीच्या अनुषंगाने करावयाच्या अधिक सक्षम उपाययोजना, नाविन्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द आराखडा तयार करणे व रस्ते, पूल बांधणी यामध्ये नवीन साहित्य, व अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करणे, शासकीय जमीनींवर नवीन प्रकल्प उभारणे त्याचप्रमाणे शासकीय विश्रामगृहांचा सुयोग्य वापर करणे, विभागाचे संगणीकरण अद्ययावत करणे, तसेच रस्ते व इमारती यांची देखभाल दुरुस्ती व नवीन कामांसदर्भात कृती आराखडा तयार करणे आणि विभागाच्या सर्व कामांची गुणवत्ता सुधारण्याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात आदी सर्व बाबींवर सविस्तर चर्चा व तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार अधिक सक्षम व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने नवीन दिशा मिळणार आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव 100 टक्के भरला; अप्पर वैतरणाही भरणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -