महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १ महिना होत आला. मात्र, अजूनही राज्यात सत्ता स्थापनेचा प्रश्न काही सुटलेला नाही. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या ‘महाविकासआघाडी’ने सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, आज मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकासआघाडी’ विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यात पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील अशी चर्चा सध्या सुरु आहे.