राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आप प्रचार समिती शुक्रवारी जाहीर केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्तापालट केल्यानंतर आताचे सत्ताधारी भाजप-शिवसेना ही युती राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय आघाडीवरही अपयशी ठरली आहे. एकेकाळी पुढारलेले राज्य म्हणून ख्याती असलेला महाराष्ट्र आज दुष्काळ, पूर, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, ढासळलेली कायदाव्यवस्था अशा अनेक प्रश्नांची बेजार झाला आहे. महाराष्ट्र सरकार कुठल्याच बाबतीत ठोस निर्णय घेताना दिसत नाही आणि दुसरीकडे विरोधी पक्ष आत्मविश्वासच गमावून बसला आहे. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याऐवजी विरोधी पक्ष स्वतःच गोंधळलेल्या स्थितीत आहे.
विकासाचे राजकारण करण्यासाठी निवडणूक लढवणार
दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या आप मॉडेल मध्ये महाराष्ट्राच्या समोर असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे आहेत. लोककल्याणकारी धोरण आणि उत्तम अंमलबजावणीमुळे शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील काम जागतिक पातळीवर प्रशंसनीय ठरले आहे. प्रस्थापित राजकारणाला एक नवे वळण देण्याचे काम दिल्लीत आप सरकारने केले आहे. तोच संकल्प घेऊन आम्ही राज्यात जास्तीत जास्त जागांवर निवडणुका लढवण्याचा निश्चय केला आहे. भावनात्मक मुद्द्यापालिकडे जाऊन विकासाचे राजकारण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार आहोत.
यासाठी आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी महाराष्ट्राची निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. शेतकरी नेते रंगा राचुरे हे या समितीचे अध्यक्ष असतील तर युनो मधील माजी अधिकारी किशोर मंध्यान उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील.
आप महाराष्ट्र प्रचार समिती:
१. शेतकरी नेते रंगा राचुरे – संयोजक
२.युनो तील माजी अधिकारी किशोर मंद्यान – सह संयोजक
३.धनंजय शिंदे – सचिव
४.जगजीत सिंग – खजिनदार
५.आप राष्ट्रीय कार्यकारी समिती च्या प्रिती शर्मा मेनन
६.देवेंद्र वानखेडे – सदस्य
७.कुसुमाकर कौशिक – सदस्य
८.अजिंक्य शिंदे – सदस्य
९.डॉ. सुनिल गावित – सदस्य
१०.मुकुंद किर्दत – सदस्य
११.संदीप देसाई – सदस्य