घरमहाराष्ट्रभरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले

भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले

Subscribe

पालघर जिल्ह्यात हळहळ, संतप्त जमावाने ट्रक पेटवला

मोखाडा तालुक्यातील नाशिक-जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचुंडी येथे शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. यात दोन बालक चिरडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, चालकाने घाईघाईने ट्रक पुन्हा मागे घेतला. त्यात एक जण गंभीर जखमी झाला. तर तेथील एका दुकानाला धडक बसली. त्यामध्ये दुकानाचे पत्रे तुटले. यामुळे संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.

मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हे जव्हार-नाशिक मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव वेगाने जात असतात. दुपारी 3.17 मिनिटांनी हा ट्रक जव्हारहून नाशिकच्या दिशेने जात होता. चालक नशेत होता. त्याने वाहन हलगर्जीने चालवीत विरुद्ध दिशेने खेळत असलेल्या बालकांना आणि प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. यात आरोही नकुल सोनार (5), पायल भालचंद्र वारघडे ( 9) या दोन्ही मुली जागीच ठार झाल्या. तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोखाडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा निषेध नोंदवित स्थानिकांनी रस्तारोको सुरू केला. त्यानंतर वाहने शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -