गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली तर अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागांत ऊन-सावलीचा खेळ रंगल्याचे दिसून येतेय. अशातच पुढील २४ तासांत राज्यातील किनारपट्टी भागांत तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर कोकणातही पावसाचा जोर कायम असणार आहे. दरम्यान पुढील ३ दिवसांत राज्यात पावसाच्या सरी कायम बसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आता २ ते ५ सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी
आजपासून पुढील ३ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम असणार असून अनेक भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता २ ते ५ सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी होणार असून तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
२ आणि ३ सप्टेंबरला महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
४ सप्टेंबरला महाराष्ट्रातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, नांदेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/QLgWPjOvwF भेट द्या. pic.twitter.com/ZpV1M0reMP
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 2, 2021
याशिवाय ५ सप्टेंबरला कोकणास, मध्य महाराष्ट्र,नांदेड, सोलापूर, सांगली, गडचिरोली जिल्ह्यात वरुणराजा बसरणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.