घरमुंबई२०१८मध्ये रस्ते अपघातात १३ हजार मृत्यू

२०१८मध्ये रस्ते अपघातात १३ हजार मृत्यू

Subscribe

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघात वाढले

 राज्यात २०१८ मध्ये सुमारे १३ हजार जणांचे अपघाती मृत्यू झाले. वर्ष २०१७च्या तुलनेत हे मृत्यू ४ टक्क्यांनी अधिक आहेत. शिवाय यातील बहुतांश मृत्यू हे वाहतुकीचे नियम न पाळल्याने मानवी चुकांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षाबाबत लोकप्रबोधन अत्यावश्यक असून याकामी प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. माध्यमांनी रस्ते सुरक्षाबाबत लोकशिक्षणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी ‘प्रेस क्लब’ मध्ये आयोजित ‘रस्ते सुरक्षा आणि अपघातांचे वार्तांकन’ याबाबत कार्यशाळा केले.

परिवहन आयुक्तालय, मुंबई प्रेस क्लब, राधी फाउंडेशन यांच्यामार्फत बुधवारी पत्रकारांसाठी ‘रस्ते सुरक्षा आणि अपघातांचे वार्तांकन’ याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी, पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस) विजय पाटील, सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, राधी फाउंडेशनच्या संस्थापक संचालक डॉ. रिटा सावला आदी मान्यवर उपस्थित होते. विकसनशील देशांमधील अपघाती मृत्यूंचे प्रमाण २०२० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार केला आहे.

- Advertisement -

आपल्या राज्यानेही तेच उद्दिष्ठ्ये ठेवले आहे. या कामात रस्ते आणि वाहनांमधील अभियांत्रिकी सुधारणा, अंमलबजावणी याबरोबर लोकशिक्षण महत्वाचे आहे. रस्ते वाहतूक करताना घ्यावयाची काळजी, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, दारु पिऊन तसेच मोबाईलवर बोलताना वाहन न चालविणे आदीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. याकामी प्रसारमाध्यमांनी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.

रस्ते अपघातात होणार्‍या मृत्यूमुळे जितके नुकसान होते त्यापेक्षा जास्त नुकसान रस्ते अपघातात लोक जखमी झाल्यामुळे होते. अनेक लोक कायमचे जायबंदी होतात. देशाच्या सक्षम मनुष्यबळाचे हे फार मोठे नुकसान असून रस्ते अपघातांमुळे देशाच्या जीडीपीचेही मोठे नुकसान होते.
– डॉ. रिटा सावला, संस्थापक संचालक, राधी फाउंडेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -