घरताज्या घडामोडी'२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून येईन'

‘२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून येईन’

Subscribe

२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावले तर मी नाही कसं म्हणणार'?, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात विचारला आहे.

‘तुम्ही मला २०२१, २०२२ एवढंच काय २०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावले तर मी नाही कसं म्हणणार’?, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात विचारला. नंतर ते म्हणाले की विनोदाचा भाग सोडून द्या पण महाराष्ट्र सरकार उद्योजकांच्या मागे ठामपणे उभं राहिलट, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

मती, गती आणि प्रगती असलेले सरकार

‘आमच सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये मती, गती आणि प्रगती हे तिन्ही गुण आहेत. त्यामुळे उद्योजकांनी निश्चिंत रहावे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असेही ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे मॅग्नेटिक पॉवर

मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे मॅग्नेटिक पॉवर आहे. पण, ही पॉवर कसली आहे कशामुळे हा शब्द वापरला तर ती पॉवर तुम्ही आहात. घराघरात लक्ष्मी जाते तेव्हा घरातले लोक कसे आहेत तेच बघते. घरातले सदस्य समाधानी आहेत का? की आपसात लढत आहेत हे पाहत असते. घरात समाधानी वातावरण असेल तरच लक्ष्मी येते. तुम्ही सगळे उद्योजक म्हणजे आमच्या घरातलेच लोक आहात. जिथे घरात ताकद मिळते तिथे साहजिकच विदेशातील ताकद येणारच. घरात येणारी ताकद म्हणजे जणू हत्तीचं बळच’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे

  • उद्योग विभागाने १ लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल देसाई आणि त्यांच्या टीमच अभिनंदन. मी त्यावेळेस १ लाख कोटींचे उद्दीष्ट दिले होते. समाधान, अभिमान वाटेल असा हा क्षण आहे.
  • उद्योग मित्र ही संकल्पना छान आहे. देशाची प्रगतीची धारण महत्वाची. काम म्हणजे काम. हे जेव्हा आपल्या अंगी भिनेल तेव्हा महाराष्ट्र प्रगती करेल.
  • तुम्हाला विश्वास देतो. तुम्ही या संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत राहील.

    हेही वाचा – ‘म्हणून भाजपला भारतरत्न तर इतरांना पीएचडी पदवी दिली पाहिजे’

    - Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -