घरमुंबईयामुळे वाढला स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव

यामुळे वाढला स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव

Subscribe

राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती.

राज्यात हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लू विषाणूचा प्रार्दुभाव वाढला असून राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. नागरिकांनी सर्दी, ताप, घसा दुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतरही २४ तासात बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरु कराव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित १६ हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी तसेच महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्य शासनाने साथरोग नियंत्रणासाठी नेमलेल्या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. त्यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसुत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा झाली. पुढील दोन दिवसामध्ये हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना तसेच महापालिकेच्या रुग्णालयांना पाठवण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाईन फ्लू बाधित रुग्णांवर उपचार करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आजार अंगावर काढू नका

डेथ ऑडिट रिपोर्ट प्राप्त

राज्यात खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची डेथ ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यात औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारण आढळून येत असून काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या, औषध घेऊन आजार अंगावर काढला आहे. आठवड्याभरानंतरही प्रकृतीत फरक न पडल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतल्याचे या रिपोर्टमध्ये दिसून येते. अशा परिस्थितीत स्वाईन फ्लूवरील उपचार वेळेत न सुरु झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्दी, ताप, घसा दुखी २४ तासाच्या आत बरी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमी फ्लू गोळ्यांचा डोस सुरु करावा. कुठल्याही परिस्थितीत आजार अंगावर काढू नका. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

हवामानातील बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत असून त्यामुळे हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून विषाणूंचा फैलाव होतो, अशा वेळी शिंकताना आणि खोकताना नाका, तोंडावर रुमाल धरावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कुठून आला हा व्हायरस

स्वाईन फ्लू ला कारणीभूत एच१ एन१ व्हायसर हा पूर्वी डुकरांमार्फत पसरत होता. मात्र हवामान अनुकूल असल्याने व्हायरस आता शिंकेनेही पसरतो. यावेळी भारतात केरळ राज्यातून एच१एन१ साथ पसरली आहे. केरळ राज्यातील अनेक नागरिक दुबईत काम करतात. दुबईत या व्हायरसची लागण झालेले नागरिक भारतात आल्यामुळे ही लागण झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -