एलआयसी धारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. याशिवाय जे कोणी एलआयसी योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असतील त्यांनी देखील ही बातमी जरुर वाचावी. कारण ३१ जानेवारी पासून एलआयसीच्या २३ योजना बंद करणार आहेत. म्हणजे १ फेब्रुवारीपासून या बंद योजनेचा लाभ घेता येणार नाही. इरडा म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जीवन विमा कंपन्यांना काही योजना बंद करण्यास सांगितलं होत. तसंच नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ज्या योजना त्यामध्ये बसत नाहीत अशा देखील योजना बंद करण्याचा आदेश दिला होता. मात्र ही मुदतवाढ करून ती ३१ जानेवारी पर्यंत करण्यात आली होती. २९ फेब्रुवारी २०२० चा पर्यंतची मुदत सध्या असलेल्या योजनांमध्ये बदल किंवा पुन्हा परवानगी मिळविण्यासाठी देण्यात आली आहे.
इरडाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. यामध्ये ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अनेक एजंटवर लगाम लावण्याचा इरडाचा मुख्य उद्देश आहे. विमा पॉलिसी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला ग्राहकभिमुख बनावायची आहे. म्हणून त्यांचा ग्राहकाला जास्तीतजासत फायदा पोहोचविण्याचा उद्देश देखील आहे.