केंद्रात दुसऱ्यांदा भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर जो पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. या निर्णयानंतर तिथे राज्याबाहेरील जनतेचा जमीन विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता महाराष्ट्र सरकारसुद्धा जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेण्याच्या तयारीत आहे. या जागेवर दोन रिसॉर्ट बांधणार असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) काश्मीर खोऱ्यात पहलगाम आणि दुसरे लेहमध्ये रिसॉर्ट बांधायचे आहे. तसेच या रिसॉर्टच्या माध्यमातून अमरनाथ यात्रा आणि वैष्णव देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मदत केली जाईल, अशी माहिती एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jaykumar Rawal, Maharashtra Tourism Minister: We are planning to open a resort near Srinagar and to open a mountaineering institute near Ladakh. In next 15-20 days a team would go there to find suitable sites. pic.twitter.com/JnNM99lMls
— ANI (@ANI) September 3, 2019
काय म्हणाले राज्य पर्यटन मंत्री
कलम ३७० रद्द झाल्यामुळे भारताच्या अन्य भागातील जनतेचा जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा, गुंतवणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. जे याआधी शक्य नव्हते. दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जागा निश्चित करण्यासाठी जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम पुढच्या १५ दिवसात सुरु होईल. एमटीडीसीच्या बोर्डाने लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अजून आम्हाला जागा सापडलेली नाही. श्रीनगरमध्ये विमानतळाजवळ आम्ही पाहत आहोत.
हेही वाचा –
महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे ‘या’ निर्णयावर एकमत