दूध दराबाबत जोवर ठोस आश्वासन मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. शेतकऱ्यांना किमान २५ ते २७ रुपये भाव मिळालाच पाहिजे. दर देणे कसे शक्य आहे. हे आम्ही सरकारला दाखवून दिले आहेच, असे सांगत आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणालेत राजू शेट्टी –
– महाराष्ट्रातून बाहेरील राज्यांना दूध जायला हवे
- Advertisement -
– बाहेरील राज्यातील दुधाला अनुदान मिळते, मग आमच्या शेतकऱ्यांना अनुदान का नाही?
– सरकारला वेळ लागणार असेल तर वेळ देऊ, पण दीर्घकालीन मार्ग निघावा