घरमुंबईटिटवाळ्यात खड्ड्यात पडून शाळकरी मुलांचा मृत्यू 

टिटवाळ्यात खड्ड्यात पडून शाळकरी मुलांचा मृत्यू 

Subscribe

शेतातील खड्ड्यात पडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

टिटवाळा येथील बल्याणी परिसरातील नांदप रोड येथे शेतातील भरणी काढलेल्या खड्ड्यात पडून ११ वर्षीय दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी घडली. मयंक शर्मा, पियुष पवन अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे येथील गुप्ता चाळीत हळहळ व्यक्त होत आहेत.

Two children die drowning in the pit
मृत पियूष

हेही वाचा – डोंबिवलीकरांच्या लोकल कळा, स्वत: अमित ठाकरे मैदानात उतरणार!

गुप्ता चाळीत राहणारा मयंक आणि पियूष हे दोघेही इयत्ता ७वीत शिकत होते. आज सोमवारी शाळा लवकर सुटल्याने मयंक आणि पियूष दोघेही घरी लवकर आले. त्यानंतर दुपारी २.३०वाजण्याच्या सुमारास दोघेही घराजवळच्या शेतात गेले. या ठिकाणी पावसाचे पाणी साठलेल्या खड्ड्यात पडून दोघांचा दुर्दैवी मुत्यू झाला. शवविच्छेदनसाठी मृतदेह रूक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. खड्ड्यातील पाण्यात पडून दोघा मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Two children die drowning in the pit
मृत मयंक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -