घरनवी मुंबईचुकीच्या पद्धतीने केलेल्या प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात जाणार - गणेश नाईक

चुकीच्या पद्धतीने केलेल्या प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात जाणार – गणेश नाईक

Subscribe

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने झाली असून त्याविरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने झाली असून त्याविरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभाग रचनेतून दिसून येत आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी पालिका क्षेत्रात ११ नवीन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण प्रभागांची संख्या १११ वरून १२२ वर गेली आहे. सोमवारी मध्यरात्री ही नवीन प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली.

नवीन प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेत आमदार गणेश नाईक यांनी प्रभाग रचना करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली या पक्षांना लाभ पोहोचवण्यासाठीच प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप केला. यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी सामिल आहेत. शहराच्या एकूण लोकसंख्येला एकूण प्रभागांनी भागून जे उत्तर येईल, तेवढी सरासरी लोकसंख्या एका प्रभागाची असायला हवी होती. मात्र संबधित अधिकाऱ्यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांना लाभ पोहोचवण्यासाठी प्रभाग रचनेचे चुकीचे गणित केले आहे. महपालिका निवडणुकीच्या संभाव्य प्रभाग रचनेत बेकायदा काम होण्याची शक्यता आमदार नाईक यांनी राज्यपाल, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त या सर्वांना अगोदरच वेळोवेळी पत्र पाठवून व्यक्त केली होती. तरी देखील प्रभाग रचनेमध्ये हेराफेरी झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ऐरोली, दिघा या भागातील प्रभाग २३ हजार लोकसंख्येचे केले आहेत. त्यामुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रात जास्त प्रभाग झाले आहेत. तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात ३० हजार लोकसंख्येचे प्रभाग केल्याने या विधानसभा क्षेत्रातील प्रभागांची संख्या कमी झाली आहे. १२२ प्रभागांपैकी अनेक प्रभागांमध्ये चुकीची रचना करण्यात आली असून या विरोधात कोर्टात दाद मागणार आहे. ज्या ज्या प्रभागात चुकीची प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्या प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असून निष्णात वकिलांची नियुक्ती करणार आहे, असे नाईक म्हणाले. पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी चुकीची आणि नियमाबाहय प्रभाग रचना केली आहे. त्यांची चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. नवीन प्रभाग रचनेत तीन-तीन किलोमिटरचे प्रभाग तयार झाले असून त्यामुळे जनतेची प्रचंड गैरसोय होणार आहे. राजकीय फायद्यासाठी नियम डावलून ही प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा –

Budget 2022: अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला बुस्टर, काय केली तरतूद? जाणून घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -