घरपालघरVasai Virar News: टँकर मागे घेत असताना झाला अनर्थ...

Vasai Virar News: टँकर मागे घेत असताना झाला अनर्थ…

Subscribe

वसई विरार परिसरातील अनेक भागात आजही पाणीटंचाई असून टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.

वसईः रिव्हर्स घेत असलेल्या पाण्याच्या टँकरखाली सापडून आजी आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. अमरावती यादव (५७) आणि इवान यादव (६) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. विरार पश्चिमेकडील यशवंत अव्हेन्य इमारतीच्या गेटमधून रिव्हर्स घेत असलेल्या पाण्याच्या टँकरखाली सापडून फूटपाथवरून जात असलेल्या अमरावती यादव आणि इवान यादव यांच्यावरून पाण्याचा टँकर गेला. त्यात इवानचा जागीच मृत्यू झाला. तर अमरावती यादव यांचा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अमरावती यादव दुपारी नातू इवानला शाळेतून घरी घेऊन जात असताना ही घटना घडली. घटना घडली त्यावेळी टँकरसोबत क्लिनर नव्हता. त्यामुळे ड्रायव्हरला रिव्हर्स घेताना अमरावती आणि इवान दिसले नाहीत आणि दोघेही टँकरच्या चाकाखाली सापडले. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला. या घटनेनंतर टँकरमाफियांविरोधातील उद्रेक दिसून आला.वसई विरार परिसरातील अनेक भागात आजही पाणीटंचाई असून टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. जुने, कालबाह्य, गळके टँकर सोबत अशिक्षित चालकांची जीवघेणी ड्रायव्हिंग, टँकरसोबत क्लिनर नसणे अशा कारणांमुळे वसईत टँकरमुळे अपघात होऊन अनेकांचे प्राण जात असतानाच शुक्रवारी दुपारी चालकाच्या चुकीमुळे आणखी दोन निष्पापांचे प्राण गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -