घरपालघरआली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ

आली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ

Subscribe

गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी गणेशमूर्तीच्या कच्च्या मालावर असलेल्या जीएसटीमुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पीओपीच्या दरात सुमारे ४० ते ५० टक्के वाढ झाल्याने गणेशमूर्तीच्या दरात सुमारे २० टक्के वाढ करण्यात आली आहे.

जव्हार: चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक तथा वैयक्तिक गणेशोत्सव दरम्यान भाविक मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे पूजन करून गणरायाच्या आराधना करत असतात. जव्हार तालुक्यातील शहरात तसेच ग्रामीण भागातही बाप्पांच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे यंदा मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे.
गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी गणेशमूर्तीच्या कच्च्या मालावर असलेल्या जीएसटीमुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पीओपीच्या दरात सुमारे ४० ते ५० टक्के वाढ झाल्याने गणेशमूर्तीच्या दरात सुमारे २० टक्के वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी जगभरामध्ये कोरोना महामारी या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला. यातून सर्वांचे जनजीवन ठप्प झाले होते. भारतात देखील निर्बंध लावण्यात आले. यामुळे सर्व सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंधमुक्त झाल्याने सर्वच धर्मीय सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत.

यंदा पीओपीच्या गणेश मूर्तीच्या दरात २० टक्के वाढ झाल्याने त्याचा फटका गणेशभक्तांना, ग्राहकांना बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बाजारात पेणच्या मातीच्या व प्लास्टरच्या सुंदर व सुबक गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. त्यामुळे भाववाढ किंवा दरवाढ झाले तरी गणेशभक्तांचा कल गणेश मूर्ती घेण्याकडेच व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याकडेच असल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

खर्च वाढला,किंमती वाढल्या

ऑगस्ट महिन्यात ३१ तारखेपासून सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मात्र, वाढत्या महागाईमध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्तीच्या किंमती २० टक्क्यांनी महागलेल्या आहेत असे माहिती मूर्तीकार साईनाथ नवले यांनी दिली आहे.कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मूर्तीकारांचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. देशातील व राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव निबंधमुक्त साजरा करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे गणेशभक्तांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -