घरक्रीडा...त्याक्षणी मला पन्नाशीत प्रवेश केल्याची जाणीव झाली - सचिन तेंडुलकर

…त्याक्षणी मला पन्नाशीत प्रवेश केल्याची जाणीव झाली – सचिन तेंडुलकर

Subscribe

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर येत्या सोमवारी (२४ एप्रिल) ५० व्या वर्षात पर्दापण करणार आहे, पण आजही क्रिकेट हाच त्यांचा श्वास आहे. क्रिकेटच्या आठवणी आणि मैदानातला आनंद आजही त्याला हवाहवासा वाटतो. पण तरीही बदल घडला आहे, असे सचिनने स्वत:च शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी आल्यानंतर काहींनी ‘कसे आहात तुम्ही’ असे विचारल्यानंतर मला पन्नाशीत प्रवेश केल्याची जाणीव झाल्याची मिश्किल टिप्पणी सचिन तेंडुलकर यांनी केली.

सचिन तेंडुलकर यांनी शुक्रवारी (21 एप्रिल) निवडक पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या वाटचालीत सातत्याने साथ देणाऱ्या माध्यमांचे आभार मानले. यावेळी बोलताना सचिनने सांगितले की, ‘पाठीवर पडलेली कौतुकाची थाप आयुष्यात कामगिरी उंचावण्यासाठी अधिक महत्त्वाची असते. माध्यमांनी नेहमी माझे कौतुक केल्यामुळेच मला क्रिकेट खेळताना कठोर परिश्रम करण्यासाठी बळ मिळाले. माझ्या आयुष्यात अपयशही आले, मी कायमच यशस्वी ठरलो नाही. मात्र क्रिकेटने मला माझ्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली आणि अपयशानंतर वाटचाल करण्यासाठी आवश्यक असणारे इंधन तुम्ही मला दिलेत. तुमच्या मदतीविना मी हा टप्पा पार केला नसता, असे त्याने उपस्थित असलेल्या पत्रकारांना आपुलकीने संवाद साधताना वक्तव्य केले.

- Advertisement -

माझ्या कारकीर्दीची सुरूवात झाली तेव्हा खेळाडू आणि माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये नेहमी व्हायचे. आम्ही एकाच खोलीत जेवायचो. त्यामुळे मैदानाबाहेर खेळाडू कसा आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील चढउतार माध्यमांनाही समजत होते, याकडे सचिन यांनी लक्ष वेधले. यावेळी त्याने त्याच्या पहिल्या मुलाखतीची आठवण सांगितली. त्याने सांगितले की, माझी पहिली मुलाखत शिवाजी पार्क येथील एका हॉटेलमध्ये झाली, पण पत्रकार मुलाखत कशी घेतात आणि त्यात काय प्रश्न विचारणार हेही माहित नसल्यामुळे थोडे दडपण आले होते, पण बनमस्का खात मी ती मुलाखत दिली.

अर्जुनला साथ देतात का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सचिन म्हणाला की, ‘मी 10 वर्षांपूर्वी निवृत्त झालो तेव्हा अर्जुनला साथ देण्याची मला विनंती करण्यात आली होती, पण ती विनंती क्रिकेटपटू म्हणून नाही, तर वडील म्हणून होती. त्याला मी नेहमीच साथ दिली. तो आता २३ वर्षांचा असून परिपक्व क्रिकेटपटू झाला आहे आणि त्याच लक्ष फक्त क्रिकेटच आहे, असेही सचिनने यावेळी अभिमानाने सांगितले.

- Advertisement -

कुटुंबीयांची कुचंबणा झाली
शालेय क्रिकेटमध्ये शतक केल्यानंतर बातमी छापून आली, पण माझे छायाचित्र छापले गेले नव्हते. त्यामुळे मित्रांनी माझी खिल्ली उडवताना म्हणाले की, ‘सबका फोटो आता है, तेरा नही आया’ त्यामुळे मी नाराज झालो. पण आई-वडिलांनी ‘पुढच्या वेळी नक्की फोटो येईल, असे सांगून माझी समजूत काढली. पण माझा राग जात नव्हता त्यामुळे वडीलांचे त्यांच्या एका मित्राबरोबर याबाबत बोलणे झाले आणि दोन दिवसांनी माझ्याबद्दल भला मोठा लेख पेपरमध्ये छापून आला. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांची कुचंबणा झाली आणि ते दोन दिवस घराबाहेर पडलेच नाहीत, अशी आठवणही सचिनने पत्राकारांशी बोलताना सांगितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -