घरठाणेठाण्यातील आयटीएस प्रकल्प चार वर्ष रखडला

ठाण्यातील आयटीएस प्रकल्प चार वर्ष रखडला

Subscribe

एकीकडे महापालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ठाण्यातील पोखरण २ येथील कोकणी पाड्यातील परिवहन सेवेचे जीपीएस केंद्र आणि आयटीएस प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून केवळ कागदावरच राहिला आहे.

एकीकडे महापालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ठाण्यातील पोखरण २ येथील कोकणी पाड्यातील परिवहन सेवेचे जीपीएस केंद्र आणि आयटीएस प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून केवळ कागदावरच राहिला आहे. हा प्रकल्प रखडल्याने प्रवाशांसाठी बसच्या गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना बस कुठे आहे, ती किती वेळांमध्ये स्टॉप येईल, बसमध्ये किती प्रवाशी आहेत, बसण्यासाठी जाग उपलब्ध आहे का ? याची इंत्यभूत स्टॉपवर लावण्यात आलेल्या स्क्रीनच्या माध्यमातून मोबाईल अॅपद्वारे पोहचणार होती. पण प्रशासनाच्या उदासिनतेचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ठाण्यात इंटेलिजन्ट्स ट्रान्सपोर्ट सिस्टिम (आयटीएस) प्रणालीच्या माध्यमातून ठाण्यातील पोखरण रोड येथील नीलकंठ याठिकाणी जीपीएस सेवा केंद्र बांधण्यात आले आहे.
पण गेल्या कित्येक वर्षांपासून हे केंद्र बंद स्थितीत आहे. शहरातील १०० मार्गावर सध्या ३७० बस सेवा कार्यरत आहे. तर आयटीएस प्राणालीच्या माध्यमातून या सर्व बसेस या जीपीएस सेवेच्या माध्यमातून जोडल्या जाणार होत्या. जेणे करून लोकांना कुठली बस केव्हा येणार आहे. तसेच बसचे भाडे किती व बस मध्ये किती सीट उपलब्ध आहे. याची माहिती ‘व्हेर इज माय टीएमटी’ बस या अॅपद्वारे घेता येणे शक्य होते.

- Advertisement -

मात्र २०१७ ते २०२१ या कालावधीत हे अॅप बहुतेक वेळ बंद स्थितीतच होते. महानगरपालिकेने या कामाचा ठेका केपीएमजी अॅडव्हटाइज सव्‍‌र्हिसेस या कंपनीला देण्यात आला होता. पण या कंपनीने गेल्या ४ वर्षात ठोस असे कुठले ही काम केलेले नसून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे बारा वाजलेले आहेत. या प्रकल्पा अंतर्गत ठाण्यातील प्रत्येक बस थांब्यावर टीव्ही बसवण्यात येणार होते. पण गेल्या वर्षभरात टीव्ही बसवण्याचे काम अजून रखडलेले आहे. या टीव्हीच्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करायचा आणि यामध्ये क्युआर कोड होता. या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. पण हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला आहे, असेही मनसेने म्हटले आहे. या प्रश्नी महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने दखल न घेतल्यास मनसे या विषयात तीव्र आंदोलन करेल. त्यास प्रशासन जबाबदार असल्याचे ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -