विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसे युती आणि आघाड्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना पक्षात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसताना खासदार संजय राऊत यांनी मात्र युतीचा जागावाटपाचा तिढा हा भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही कठीण असल्याची प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. जागावाटपांबाबत युतीपेक्षा माध्यमेच जास्त आग्रही भूमिका धरत असल्याची टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली. जागावाटपाचा हा जटील प्रश्न येत्या २४ तासात सुटणार असून सर्वांनी थोडा वेळ वाट पाहावी, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
‘युतीच्या जागावाटपाचा तिढा भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही कठीण’
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -