घरदेश-विदेशअखेर निकाल आला! '२७ नोव्हेंबरला बहुमत चाचणी घ्या', सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!

अखेर निकाल आला! ‘२७ नोव्हेंबरला बहुमत चाचणी घ्या’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. या निर्णयानुसार २७ नोव्हेंबर रोजीच बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाय, उद्याच संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी व्हायला हवेत असं देखील न्यायालयाने बजावलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बहुमत चाचणीदरम्यान कोणत्याही प्रकारे गुप्त मतदान न घेता मतदान प्रक्रियेचं लाईव्ह टेलिकास्ट करावं, असं देखील न्यायालयानं सांगितलं आहे. दरम्यान, बहुमत चाचणीसाठी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची आवश्यकता नसून त्याआधीच बहुमत चाचणी घ्यायला न्यायालयानं सांगितलं आहे. त्यामुळे आता विधानसभेत हंगामी अध्यक्षांच्या निगराणीखालीच बहुमत चाचणी घेतली जाणार आहे.

घोडेबाजारासारखे प्रकार टाळण्यासाठी अशा प्रकारे तातडीने बहुमत चाचणी घेणं आवश्यक आहे. त्यासाठीच उद्या संध्याकाळी ५ वाजता बहुमत चाचणी घ्यायचे आदेश दिले आहे. तसेच, यावेळी हंगामी अध्यक्षच चाचणी घेतील. ही चाचणी गुप्त मतदान पद्धतीने होणार नाही. या प्रक्रियेचं लाईव्ह टेलिकास्ट होईल, असं न्यायमूर्तींनी यावेळी नमूद केलं. आदेश यावेळी कोर्टाकडून देण्यात आले.

- Advertisement -

काय झालं सुनावणीदरम्यान?

शनिवारी २३ नोव्हेंबरला भल्या सकाळीच राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. मात्र, यावरच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा देखील समावेश होता. यामध्ये महाविकास आघाडीकडून तातडीने बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.


एकूण सुनावणीदरम्यान कुणी काय दावा केला? वाचण्यासाठी क्लिक करा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -