घरदेश-विदेशपर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी महिंद्राच्या शिफारशी

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी महिंद्राच्या शिफारशी

Subscribe

दिवाळी पर्यावरणपूरक पध्दतीने साजरी कशी करावी याबद्दल महिंद्रा समूहाने शिफारशी पत्राद्वारे काही टीप दिल्या आहेत.

दिवाळी हा सण केवळ दिव्यांच्या आराशीपुरता मर्यादीत नसतो, तर हा आनंदाचा, मौजमजेचा, उत्साहाचाही सण असतो. आपल्या परंपरेनुसार, दिवाळीत कुटुंबिय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन उत्सव विविध प्रकारे साजरा करतात आणिआपली नात्यांची वीण घट्ट करतात. मात्र सण उत्साहात साजरा करून झाल्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो का? घशातील खवखव, डोळ्यांची आग आणि धुराने काळवंडलेले वातावरण यांनी आपल्या आनंदावर विरजण पडले नाही ना? यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक पध्दतीने साजरी कशी करावी याबद्दल महिंद्रा समूहाने शिफारसपत्रातून काही टीप दिल्या आहेत.

काय आहेत टीप?

  • घरात रोषणाई करण्यासाठी एलइडीचे दिवे वापरा. विशेषतः घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी तेलाचे दिवे धोकादायक ठरू शकतात. एलईडी दिवे सुरक्षित व वीजबचत करणारे असतात.
  • आकाशकंदिल बनविण्यात घरातील सर्वांना सहभागी करून घ्या. त्यामुळे तुमच्यातील नातेसंबंध वाढतीलच, त्याशिवाय कुटुंबियांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल.
  • हाताने बनविलेल्या वा स्थानिक बाजारात मिळणाऱ्या वस्तू भेट म्हणून द्या. ऑनलाईन पध्दतीने मागवलेल्या वस्तूंमुळे कार्बनचे उत्सर्जन जास्त होत असते.
  • मित्र, कुटुंबिय, हाताखालील कर्मचारी, ग्राहक, पक्षकार, सहकारी यांना झाडांची रोपे भेट द्या. त्यामुळे या भूतलावरील हिरवाई वाढण्यास मदत होईल आणि आपल्याला ते खिशालाही परवडेल.
  • फराळाचे पदार्थ आणि मिठाई घरीच बनवा – ते आरोग्यदायी असते आणि स्वस्तही पडते. बाहेरून घ्यायचेच झाल्यास स्थानिक बाजारातून खाद्यपदार्थ खरेदी करा.
  • घर सजविण्यासाठी तोरण बांधताना वा रांगोळीमध्ये स्थानिक बाजारात मिळणारी फुले-पाने वापरा.
  • कापडाच्या वा तागाच्या पिशव्यांचा वापर करण्यास इतरांना प्रोत्साहन द्या अथवा त्यांना या पिशव्या भेट द्या.
  • प्लास्टिक वापरणे टाळा. भेटवस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे पॅकेजिंग करताना हातकागदाचा उपयोग करा.
  • मोठा आवाज करणारे, धूर सोडणारे फटाके उडवणे टाळा. मुळात फटाके उडवूच नका आणि प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा. फटाक्यांमुळे आवाजाचे आणि हवेचे प्रदूषण होते. दिवाळीतील फावला वेळ आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत घालवा, बैठे खेळ खेळा.
  • घरातील क्रॉकरी आणि कटलरी या वस्तू विघटीत घटकांपासून तयार केलेल्या असतील असे पाहा. त्यामुळे घरातील गृहिणींना आणि मोलकरणींना कमी काम करावे लागेल. या विघटीत कटलरीची विल्हेवाट लावतानादेखील ती विघटीत होणाऱ्या पिशवीत टाका आणि जबाबदारीने काम करा.
  • सण साजरा झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. त्यातील विघटीत होणारा आणि न होणारा कचरा वेगवेगळा काढून त्यांची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
  • सर्वात शेवटी महत्वाचे, उत्सव संपल्यानंतर आपल्या घरात आणि परिसरात कोठेही कचरा राहणार नाही, याची काळजी घ्या. आनंदाच्या दिवसांमध्ये आजूबाजूला कचरा दिसत राहणे, हे योग्य नाही, असे शाश्वत विकास विभागाकडून (महिंद्रा समूह) सांगण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -