घरमनोरंजनबाल प्रेक्षकांसाठी दिवाळीत धम्माल नाट्य मनोरंजन

बाल प्रेक्षकांसाठी दिवाळीत धम्माल नाट्य मनोरंजन

Subscribe

दिवाळीची सुट्टी म्हटली की मुलांसाठी मज्जाच मज्जा असते. पण सुट्टीत मुलांसाठी नेमकं काय करायचं? हा पालकांना मोठा प्रश्न पडतो. त्यात हल्ली मुलांच्या आवडी निवडी बदलू लागल्या. मनोरंजनाची साधने बदलली. टीव्ही, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, मोबाईल गेम आणि विविध अ‍ॅप्स यामुळे बालमनाच्या मनोरंजनाच्या संकल्पना पूर्ण बदलल्या. तरी आजही मुलांना बालनाट्य पहावीशी वाटतात. कारण सामाजिक संदेश देणारी जुनी लोकप्रिय नाटकं नव्या रूपात प्रत्यक्षात रंगमंचावर पहाण्याची मज्जा काही वेगळीच असते. गेली अनेक वर्षे चित्रपट व नाट्य निर्मिती व व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणारे अभिनेते संतोष वाजे बालप्रेक्षकांसाठी सामाजिक संदेश तसेच धम्माल मनोरंजन करणारी आठ बालनाट्ये घेऊन येत आहेत.

संतोष वाजे व एबीआय आर्टिस्ट क्लब मुंबई प्रस्तुत, ज्योती वाजे निर्मित ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘बुड बुड घागरी व अकबर बिरबल’, ‘विक्रम आणि वेताळ’, ‘अलीबाबा आणि ४० चोर’ ही सात बालनाट्ये रंगभूमीवर येत असून या सातही नाटकांचे लेखन राजेश कोळंबकर यांनी तर दिग्दर्शन राहुल इंगळे व सागर जेठवा यांनी केले आहे. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘बुड बुड घागरी या बालनाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, रविवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता टिळक स्मारक, पुणे येथे होणार आहे तर अकबर बिरबल’, ‘विक्रम आणि वेताळ’, ‘अलीबाबा आणि ४० चोर या बालनाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, शनिवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक, पुणे तर शनिवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२. ३० वाजता कालीदास नाट्यगृह, नाशिक येथे होणार आहे.

- Advertisement -

लहान मुलांना विनोदी, परिकथा, अद्भूत व ऐतिहासिक अशी विविध नाटकं फारच आवडतात. संतोष वाजे यांनी अशीच नाटके बाल प्रेक्षकांसाठी निवडली असून या सर्व नाटकातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. या सर्व गोष्टी अनेकदा मुलांच्या ऐकण्यात किंवा पहाण्यात आल्या आहेत. त्यातील गंमत, चातुर्य, विनोद, शौर्य सर्वांना माहीत आहे. पण प्रत्यक्षात रंगमंचावर ही सर्व नाटकं रंगमंचावर पहाताना मुलांना वेगळीच मजा येणार आहे. कारण या सर्व नाटकात विविध शाळेतील लहान मुले काम करीत असून त्यांचा उत्स्फूर्त अभिनय या नाटकात पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे फूल टू टाइमपास असलेली ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘बुड बुड घागरी’ ही चार नाटके एकाच तिकीटावर व ‘अकबर बिरबल’, ‘विक्रम आणि वेताळ’, ‘अलीबाबा आणि ४० चोर’ ही तीन नाटके एकाच तिकीटावर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे यावेळची दिवाळी मुलांसाठी फुल्ल टू धमाल असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -