भाजपचे पदाधिकारी सुरेश नाखवा यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील कांग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाची तक्रार दाखल केली आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यावर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप त्यांनी ठेवला आहे. एका टीव्ही शोमध्ये “हिंदूइजम हा जगातील सर्वात हिसंक धर्म आहे.” असे वक्तव्य उर्मिलाने केले होते, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. नाखवा यांनी आपल्या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष आणि मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
#Mumbai: BJP's Suresh Nakhua has filed a criminal complaint against Congress's Urmila Matondkar,states,"She has hurt religious sentiments of Hindus by calling 'Hinduism the most violent religion in the world' on a TV show".He also named Congress Pres&a journalist in the complaint
— ANI (@ANI) April 6, 2019