घरमुंबईभिवंडीत धोकादायक इमारत कोसळली

भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली

Subscribe

या घटनेमुळे भिवंडी पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहर महानगर पालिका क्षेत्रातील इस्लामपूरा या भागात एक मजली जुनी धोकादायक इमारत आज दुपारी कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मालमतेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

१३ भाडेकरुंचे वास्तव्य

या संभावित घटनांमुळे सतर्क झालेल्या पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी शहरातील पाचही प्रभागांतर्गत असलेल्या अनधिकृत व धोकादायक इमारतींची माहिती प्रभाग अधिकाऱ्यांकडून तातडीने मागविली आहे. असे असतानाच महापालिका प्रशासकीय कार्यालयालगत असलेल्या इस्लामपूरा येथे शकीना हाजी इन्सानबी मियाजी यांच्या मालकीची घर नं.२२०/ १ ही धोकादायक असलेली एक मजली इमारत दुपारी ३च्या सुमारास अचानकपणे कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये १३ भाडेकरू राहत होते. मात्र सदर इमारत मोडकळीस आल्याने काही कुटूंबं घर बंद करून इतरत्र राहण्यासाठी निघून गेले होते.

- Advertisement -

…आणि तो कुटुंबासह घराबाहेर पडला

मात्र सफी अन्सारी हा आपल्या कुटुंबासह या इमारतीत राहत होता. इमारतीच्या छताचे स्लॅब कोसळत असल्याचे त्याच्या निदर्शनास येताच सफी कुटुंबासह घराबाहेर पडला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे व स्थानिक नगरसेवक मलिक मोमीन हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने मदतकार्यास सुरुवात केली. या दुर्घटनेत विस्थापित झालेल्या कुटुंबांची शेजारच्या इमारत आणि पालिकेच्या शाळेत राहण्याची तात्पुरती व्यवस्था पालिका प्रशासनाने केली आहे, अशी माहिती प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी दिली. दरम्यान पालिका उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली.

हेही वाचा – केडीएमसी घनकचरा प्रकल्पासाठी दोन पर्याय : महासभेची परीक्षा

अन्यथा पालिकेविरोधात आंदोलन करणार

पालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांपासून धोकादायक इमारतींची संख्या बेसुमार वाढली आहे. सुमारे ९७८ धोकादायक इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. या इमारतींमध्ये २ हजार ४६० कुटूंबं राहत असून सुमारे १५ हजार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या इमारत दुर्घटनांची दखल घेऊन राज्य शासनाने अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिलेले आहेत. मात्र पालिकेचे अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त दीपक कुरळेकर हे राज्यशासनाचे प्रतिनिधी असल्याने ते गेल्या ५ वर्षांपासून एकाच जागेवर बसून फक्त कागदी घोडे नाचवून कारवाई झाल्याचे दाखवत आहेत. पालिका क्षेत्रात वारंवार होणाऱ्या इमारत दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने तात्काळ उपाय योजना हाती घ्यावी, अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भिवंडी महापालिकेतील भाजपचे गटनेता निलेश चौधरी यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -