'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली आमि सर्वात लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करत आहे. सध्या ही मालिका एका नवीन वळणारवर आली आहे. राधिकाने गुरुनाथला घटस्फोट देऊन त्याच्यासोबत असलेलं नातं तोडून तिने सौमित्राशी नवं नातं सुरु करणार आहे.