- १७४ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगली सुरूवात केली आहे.
- रविंद्र जडेजाने घेतलेल्या ४ विकेटमुळे बांगलादेशला १७३ धावाच करता आल्या. बांगलादेशकडून मेहदी हसनने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर बुमराह आणि भुनेश्वर कुमारने ३-३ विकेट घेतल्या.
- रविंद्र जडेजाने शकिब, मोहम्मद मिथून आणि मुशफिकूर रहिम यांना झटपट माघारी पाठवले आहे.
- या सामन्यातून एकदिवसीय संघात पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने आपल्या पहिल्याच शतकात विकेट घेतली.
- भुवनेश्वर आणि बुमराह या दोघांनीही १-१ विकेट घेतली आहे.
- बांगलादेशच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली आहे. त्यांचे सलामीवीर अवघ्या १७ धावांत माघारी परतले आहेत.
- या सामन्यात दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेलेल्या हार्दिक पांड्याच्या जागी रविंद्र जडेजाला संघात संधी मिळाली आहे.
- सुपर ४ फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.